Type Here to Get Search Results !

एक काळ असाही होता...

0

 एक काळ असाही होता, जेव्हा

संपूर्ण घर एकाच टॉवेलने आंघोळ करायचे,

दुधाचा नंबर आळीपाळीने यायचा,

धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारायचा,

वडिलांच्या माराची भीती सर्वांना सतावत होती,

मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे,

संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंड पुरी खाऊन साजरे करायचे,

मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात, याची वाट पहायची,

शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता,

भाऊ-बहिणीचे प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते,

पैशाचे महत्त्व कोणाला माहीतही नव्हतं,

मोठ्याचं दप्तर, पुस्तके, सायकल, कपडे, खेळणी, पेन्सिल,पाटी, चप्पल धाकट्याचीच होती.

तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे…



~~ आता ~~


टॉवेल वेगळा झाला, दूध ओसंडून वाहू लागले,

आई तळमळू लागली, वडील घाबरू लागले.

मावशीपासून दूर झालो, पुरीऐवजी पिझ्झा, बर्गर, मोमो आला,

कपडेही वैयक्तिक झाले, भावांपासून दूर गेले,

बहिणीचे प्रेम कमी झाले,

पैसा महत्वाचा झाला आहे, आता सर्व काही नवीन हवे आहे,

आजी, आजोबा वगैरे औपचारिक झाले.

पाकिटात नोटा आल्या..

अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती विसरलो.

खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं.

नात्यांचा अर्थ बदलला आहे,

आपण जगतो असे दिसते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad